Home » अकोला पोलिसांविरोधात व्हिडीओ बनवत युवकांनी केली आत्महत्या

अकोला पोलिसांविरोधात व्हिडीओ बनवत युवकांनी केली आत्महत्या

by Navswaraj
0 comment

अकोला : उगवा गावात दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्याने अकोल्यातील अकोट फैल पोलिसांनी प्रकरण दाबण्यासाठी एक लाख रुपये वसूल केल्याचा आरोप केला आहे. उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले ३६ वर्षे आणि आशिष गोपीचंद अडचुले ३५ वर्षे या दोघांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली होती.

अकोट फैल पोलिस ठाण्यात आशिष अडचुले याच्याविरुद्ध ऑक्टोंबर २०२१ मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण केल्याप्रकरणात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे.  आत्महत्येपूर्वी आशिषने एक व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला होता.

‘नमस्कार, न्यायाधीश साहेब. माझं शेवटचं बयाण आहेय. अकोट फेल पोलिसांनी माझी फसवणूक केली. माझ्याकडून पाच गुटख्याचे पाकीट पकडले अन् पोलिसांनी माझ्याकडून एक लाख रुपये घेतले. आणि तुझ्यावर कारवाई करत नाही, तू पैसे दे, पैसे घेतल्यानंतर सांगितलं की वरुन खूप दबाव आहे. आता तुझ्यावर कारवाई करावीच लागते. तू टेंशन घेवू नको. तुला पोलीस कोठडी मागत नाही. अशा पद्धतीने तुझ्यावर कारवाई करतो, अशा प्रकारे दबाव आणला. नितीन सुशील, पांडे साहेब, इंगळे साहेब, असलम साहेब, तोपकर मेजर, दाते मेजर, छोटू पवार हे सर्व कर्मचारी आहे. अन् सर्व अकोट फैल पोलीस ठाण्यातील आहेत. त्यात आणखी दोघांचा समावेश असून त्यांची नावे मला आठवत नाहीत. या सर्वांनी मला दबावात घेत कारवाई केली. मी दुकानदार आहे, काही गुन्हेगार नाही. न्यायाधीश साहेब, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही योग्य रीतीने कारवाई कराल, आता पोलिसांवर माझा विश्वास राहिला नाही. भांडे आणि येणकर मेजर यांना देखील हप्ते दिले. माझ्याजवळ कुठलाही मुद्देमाल सापडला नव्हता. परंतु तरीही पोलिसांनी चुकीची कारवाई केली. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर यांच्याकड चौकशी सोपवली आहे.  मृतक आशिष अडचुले याच्याविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने पोलिसावर केलेले आरोप निराधार आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांविरोधात तक्रार दिलेली नाहीय. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. या संदर्भात पुढील तपास शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर करीत आहे. चौकशीत सत्य समोर येईलच, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार, असे अकोट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!