Home » ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांची पदयात्रा सुरू

ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांची पदयात्रा सुरू

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्न पुन्हा तापला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख बाळापूर मतदार संघातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

६९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी अकोला ते नागपूर पदयात्रा सुरु केलीय. अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मंदिरापासून त्यांच्या अकोला-नागपूर पदयात्रेला प्रारंभ झाला. ६९ गावांना प्यावे लागत असलेले खारे पाणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्यायला देणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. बाळापूर मतदार संघातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचं तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्यानं आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले आहे. यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील वान धरणातून होणाऱ्या ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्याचा विरोधात विधानभवन परिसरात आंदोलन सुरु केलं होतं. यानंतर विधानसभेत वेगाने चक्र फिरलीत आणि त्यांना आश्वासन देण्यात आले होते.

अकोला तालुक्यातील ६९ गावांना वान धरणातून हा पाणीपुरवठा होणार होता याकरिता १०८ कोटी खर्च करून ७० किलोमीटरची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली आहे. या स्थगिती विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असूनही देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठाला स्थगिती दिल्याचा आरोप बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!