Home » राणा म्हणाले, उद्धव यांच्या गर्वाचे घर खाली झाले

राणा म्हणाले, उद्धव यांच्या गर्वाचे घर खाली झाले

by नवस्वराज
0 comment

अमरावती : उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा विरोध करीत आपल्याला आणि खासदार नवनीत राणा यांना कारागृहात टाकले. जे श्रीरामाचे नाही होऊ शकले ते कुणाचेही होऊ शकत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. त्यामुळे ठाकरे यांच्या गर्वाचे घर न्यायालयाच्या निकालानंतर खाली झाले आहे, अशी प्रतिक्रिया युवा स्वाभिमान पक्षाचे नेते अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिली.

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अहंकार चक्काचूर झाला आहे, असे राणा म्हणाले. शिंदे- फडवणीस सरकार लोकांच्या हिताचे सरकार आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आहे, हे न्यायालयाच्या निर्णयावरून सिद्ध होते, असे राणा म्हणाले.

हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनादरम्यान खासदार नवनीत राणा व आपल्यावर झालेल्या दडपशाहीचा उल्लेख राणा यांनी केला. १४ दिवस कारागृहात ठेवल्याचा संताप यापूर्वीही खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. त्याचा पुनरुच्चार रवी राणा यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओ प्रतिक्रियेत केला. उद्धव ठाकरे यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतरही त्यांनी अहंकार सोडला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चपराक लगावल्यामुळे तरी त्यांनी सावध व्हावे, असे आमदार रवी राणा म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!